
पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (20 मे) मतदानाची धुमचक्री पार पडणार आहे. एकूण पाच टप्प्यातील निवडणुकां पैकी राज्यातील चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर सोमवारी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघातील पाचव्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण हे मतदारसंघ आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्यानं सर्वांचंच लक्ष याकडं लागलं आहे.